धोका वाढला; जिल्ह्यात 24 तासात तब्बल 685 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण मागील 24 तासात सापडले आहेत. आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 685 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 685 पैकी 424 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 261 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 11 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

काल कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याचे जिल्हावासियांचे समाधान एक दिवस पण टिकले नाही. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. 24 तासात 685 नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 16 हजार 574 वर जाऊन पोहचली आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात 424 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 261 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 11 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 475 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.86 % आहे. आज जिल्ह्यात 145 जण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 12366 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रिकव्हरी रेट 74.61 टक्के आहे.

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 685 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 152, दापोली 162, खेड 55, गुहागर 34, चिपळूण 95, संगमेश्वर 166, मंडणगड 8, राजापूर 2 आणि लांजा तालुक्यात 11 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 12.38% आहे.