जिल्ह्यात 24 तासात कोरोनाने सहा जणांचा मृत्यू; आतापर्यंत 421 जणांचा बळी

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 421 जणांचा मृत्यू झाला आहे. 

 कोरोना बाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आतपर्यंतचे सर्वाधिक 417 रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासात उपचारखाली असलेल्या 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दापोली तालुक्यात 2, लांजा, रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येक एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 421 जणांचा मृत्यू झाला आहे.