जिल्ह्यात 24 तासात पुन्हा 227 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असताना  सोमवारी जिल्ह्यात पुन्हा दोनशे पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी 251तर शनिवारी 248 रुग्ण सापडले रविवाारी 214 आणि सोमवारी 227 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 227 पैकी 193 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 34 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. आज 5 रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

मागील तीन दिवसात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा स्फोटच झाला. आता पर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. 24 तासात 227 नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 12 हजार 960 वर जाऊन पोहचली आहे. रविवारी आलेल्या अहवालात 193 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 34 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज 913 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत एकूण 107496 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

चोवीस तासात 72 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 11 हजार 122 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 85.81 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने 5 रुग्णाचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 403 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.11 % आहे.

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 214 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 35, दापोली 22, खेड 22, गुहागर 34, चिपळूण 92, संगमेश्वर 14, आणि लांजा तालुक्यात 8 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 10.67% आहे.