सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याची रुग्णसंख्या दोनशेपार; 24 तासात 214 पॉझिटिव्ह रुग्ण

तब्बल 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असताना सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात दोनशे पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी 251 तर शनिवारी 248 रुग्ण सापडले असताना 24 तासात जिल्ह्यात तब्बल 214 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 214 पैकी 159 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 55 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत.

मागील तीन दिवसात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा स्फोटच झाला. आता पर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. 24 तासात 214 नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 12 हजार 733 वर जाऊन पोहचली आहे. रविवारी आलेल्या अहवालात 159 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 55 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज 722 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत एकूण 106566 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

चोवीस तासात 166 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 11 हजार 050 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 86.78 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने 7 रुग्णाचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 398 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.12 % आहे.

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 214 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 58, दापोली 9, खेड 25, गुहागर 17, चिपळूण 53, संगमेश्वर 30, राजापूर 11 आणि लांजा तालुक्यात 11 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 10.67% आहे.