जिल्ह्यातील १५३० शेतकऱ्यांकडून १७ हजार ७८५.४५ क्विंटल भात खरेदी

रत्नागिरी:- रत्नागिरी मार्केटिंग फेडरेशनकडुन जिल्ह्यातील १५३० शेतकऱ्यांकडून १७ हजार ७८५.४५ क्विंटल भात खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात १५ केंद्रांवर भात खरेदी सुरु असून प्रती क्विंटल १८६८ दर देण्यात येत आहे. यावर्षी २२ हजार क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट आहे. दि.३१ मार्च पर्यत अवधी असल्याने उद्दिष्टपूर्ती होण्याची शक्यता आहे.

दि. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन शेतकाऱ्यांकडून शासन ठरवून देणार आहे. त्या दराने शेतमालाची खरेदी करून पुरवठा समितीकडे वितरीत करण्यात येते. जिल्ह्यात या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. सन २०१३‚१४ मध्ये चांगला प्रतिसाद लाभला होता. त्यावर्षी २४ हजार ४९८.४६ क्विंंटल भाताची खरेदी झाली होती. यासाठी शासनाने १३१० रुपये दर दिला होता. त्यावेळी जिल्ह्यातील १९५९ शेतकऱ्यांनी आपल्याकडील भाताची विक्री केली होती.भात गोडावूनमध्ये शिल्लक राहिल्याने पुढील दोन वर्षे भाताची खरेदीच झाली नव्हती.
 

जिल्ह्यात खरेदी‚विक्री संघ आणि विविध कार्यकारी सोसायटी यांच्याकडून धान्याची खरेदी करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील १९० शेतकऱ्यांकडून ३९६४ क्विंटल, दापोली येथे ६४ शेतकऱ्यांकडून ६०६  आणि केळशी येथील १९८ शेतकऱ्यांकडून १११४.८० गुहागर येथील १८७ शेतकऱ्यांकडून १२१७.६०, रत्नागिरी येथील १५३ शेतकऱ्यांकडून १२७२,४० संगमेश्वर येथील ११९ शेतकऱ्यांकडून १६००.४०, लांजा येथील २२ शेतकऱ्यांकडून १३३.६०, राजापूरातील ४६ शेतकऱ्यांकडून ४९५०.५,  पाचल येथील ३६ शेतकऱ्यांकडून ४७०.६०,  चिपळूणातील १५६ शेतकऱ्यांकडून २५४८.४०, मिरवण येथील १०४ शेतकऱ्यांकडून १६६७.२० आकलेतील ४० शेतकऱ्यांकडून ४३९.२०, शिरगाव येथील १७८ शेतकऱ्यांकडून १६४८.८०, शिरळ येथील ४१ शेतकऱ्यांकडून ६०८.४० क्विंटल भाताची खरेदी आतापर्यत करण्यात आली.  मार्केटींग फेडरेशनने यावर्षी २२ हजार क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले असून ४ हजार २१४.५५ क्विंटल भात खरेदीची गरज असून दि.३१ मार्च पर्यत पूर्तता होण्याची शक्यता आहे.