भाट्ये किनारी सापडला तरुणाचा मृतदेह; पुलावरून उडी मारत आत्महत्या केल्याचा संशय

रत्नागिरी:- गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी राजिवडा खाडीकिनारी सापडून आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संतोष हरिश्चंद्र लोखंडे (35,रा.रविंद्रनगर कुवारबाव, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत त्याचा मेव्हणा प्रशांत दामोदर आरेकर (रा.रविंद्रनगर कुवारबाव, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली.त्यानूसार,गुरुवारी सायंकाळी संतोष घरातून निघून गेला होता. तो रात्री उशिरापर्यंत न परतल्याने त्याच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता झाल्याबाबत शहर पोलिसांना खबर दिली होती.शुक्रवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह राजिवडा खाडीत सापडून आल्यावर त्याच्या नातेवाईकांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो संतोषचाच असल्याचे स्पष्ट झाले.त्याच्या आत्महत्येमागचे कारण समजु शकलेले नसून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.