जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतींचा 16 फेब्रुवारीला सन्मान 

रत्नागिरी:- संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषद गटांतर्गत एका उत्कृष्ट ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. त्यात निवडण्यात आलेल्या 55 ग्रामपंचायतींचा सन्मान 16 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे.

स्वच्छतेसह सांडपाणी नियोजन करणार्‍या ग्रामपंचायतींचा सन्मान केला जातो. जिल्हा परिषद गटात अव्वल आलेल्या ग्रामपंचायतींना 50 हजार रुपये दिले जातात. जिल्हास्तरावर तिन क्रमांक काढण्यात येतात. 2018-19 या आर्थिक वर्षात निवडलेल्या ग्रामपंचायतींचा सत्कार होणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या अंजनवेल (गुहागर) ग्रामपंचायतीला पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांक जामगे (खेड) ग्रामपंचायतीला 3 लाख रुपये, तर तृतीय क्रमांक प्राप्त वालोपे (चिपळूण) ग्रामपंचायतीला 2 लाखाचे पारितोषीक मिळाले आहे. मंजूर निधी त्या-त्या ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यांचा सर्टीफिकेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे.