रत्नागिरी तालुक्यात ५३ ग्रामपंचायतीत १०८० उमेदवारांचे अर्ज

रत्नागिरी:- ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती.रत्नागिरी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या ५४७ जागांसाठी १०८० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.

दिनांक २१ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली.मंगळवारी ऑनलाईन अर्ज़ भरताना सर्व्हर जाऊन झाल्याने गोंधळ उडाली होता.आज मात्र ऑनलाईन अर्ज़ भरण्याचे काम सुरळीत झाले.ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन अर्ज़ घेण्यात आले आहेत.रत्नागिरी तालुक्यातील उक्षी आणि जांभरण या ग्रामपंचायतीत प्रत्येक जागेवर एकच उमेदवार आल्याने या ग्रामपंचायत बिनविरोध होणार आहेत.अनेक ग्रामपंचायतीत काही जागांवर एकच अर्ज आल्याने त्या जागा बिनविरोध होणार आहेत.उद्या गुरूवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जानेवारी पर्यंत आहे.त्या दिवशी अंतिम उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे.त्यादिवशी बिनविरोध उमेदवारांची नावे जाहिर होतील.