जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे ढग; अनेक भागात पावसाची रिपरिप

रत्नागिरी:- मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असताना सोमवारी सकाळी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रिपरिप पावसाने हजेरी लावली. सकाळ पासून ढगांच्या गडगडाटाने देखील पावसाची वर्दी दिली. सोमवारची सकाळच ढगाळ वातावरणाने सुरू झाली. अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यास बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.