दिलासा; तब्बल 292 अहवाल निगेटिव्ह केवळ 3 पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- जिल्हावासीयांना दिलासा देणारे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. मागील 24 तासात 295 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 292 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर केवळ तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही.
 

नव्याने 3 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 666 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 292 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 53 हजार 98 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात तब्बल 14 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 200 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 319 असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.62 टक्के आहे.