जिल्ह्यात कोरोनाचे केवळ आठ पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यत केवळ आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 32 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही. 

मागील काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. नव्याने 8 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 594 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 32 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत 50 हजार 845 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 5 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 118 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाचाही मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.46 टक्के आहे.