जिल्ह्यात चोवीस तासात 100 जणांचे अहवाल निगेटिव्ह; केवळ 18 पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. मागील चोवीस तासात तब्बल शंभर जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे तर केवळ 18 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही. 

मागील काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. नव्याने 18 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 494 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 100 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 49 हजार 160 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 93.86 टक्के आहे. 

सोमवारी 26 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 7 हजार 973 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाचाही मृत्यू झालेला नाही.