जिल्ह्यात 67 नवे पॉझिटिव्ह; दोन रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण आटोक्यात येत आहे. मागील 24 तासात 67 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 7 हजार 566 झाली आहे. याशिवाय मागील 24 तासात जिल्ह्यात आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा 269 वर गेला आहे.  

नव्याने सापडलेल्या 67 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 35 जण आरटीपीसीआर तर 32 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. सर्वाधिक 37 रुग्ण रत्नागिरीतील तर  चिपळूण तालुक्यात 17 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय खेड 3, गुहागर 8 आणि राजापूर तालुक्यात 2 रुग्ण सापडले आहेत. 
 

दरम्यान मागील चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 267 वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या दोन रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 1आणि चिपळूण मधील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची सरासरी 3.5% पोहोचली आहे.