कोरोना बाधित पाच रुग्णांचा मृत्यू; 44 जणांना लागण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला असला तरी मृत्यूचे प्रमाण मात्र वाढतच आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून आता पर्यंत जिल्ह्यात कोरोनाने 245 बळी घेतले आहेत. 
 

मागील चोवीस तासात जिल्ह्यात 45 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात 7 आरटीपीसीआर तर 37 जणांनी अँटिजेन टेस्ट केली होती. मंडणगड, दापोली, खेड तालुक्यात एकही रुग्ण सापडलेला नाही. गुहागर 2, चिपळूण 14, संगमेश्वर 1, रत्नागिरी 22, लांजा 2 आणि राजापूर तालुक्यात 3 रुग्ण सापडले आहेत.

मागील चोवीस तासात पाच रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रत्नागिरीत 2, दापोली 1, चिपळूण 1 आणि लांजा तालुक्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता पर्यंत 245 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.