जिल्ह्यात कोरोनाचे 120 नवे रुग्ण; 6 जणांचा मृत्यू

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 120 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 6 हजार 417 इतकी झाली आहे. मागील चोवीस तासात सहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 193 वर पोचली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर पुन्हा वाढून तीन टक्क्यांवर पोचला आहे.
 

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात तब्बल 120 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तसेच 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील चार दिवासात तब्बल 25 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
 

नव्याने सापडलेल्या 120 रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यातील 6 रुग्ण, खेड 16, गुहागर 10, चिपळूण 32, संगमेश्वर 16, रत्नागिरी 29, लांजा 6 आणि राजापूर तालुक्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे. 
मागील चोवीस तासात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूसंख्या 193 आहे. यात चिपळूण मधील 2, रत्नागिरी 2, संगमेश्वर आणि दापोली येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.