मेर्वीत पिसाळलेल्या बिबट्याचा तिघांवर जीवघेणा हल्ला

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी बेहेरे टप्पा येथे पिसाळलेल्या बिबट्याने लागोपाठ तिघांवर हल्ला केला. सोमवारी रात्री आठ ते नऊ यादरम्यान ही घटना घडली. त्यामुळे परिसरात बिबट्याची एकच दहशत पसरली आहे.                    

काही दिवसांपूर्वी बिबट्याने याच परिसरात 5 सप्टेंबर रोजी सकाळी एका शेतकऱ्यांवर हल्ला केला होता. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेने ग्रामस्थांनच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. वन विभागाने याची  गंभीर दखल घेतली. वन विभागाने तातडीने मुंबई व पुणे येथून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पथक दाखल झाले. सहा दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर त्या पथकाला यश आले नाही. बिबट्याने कॅमेरे पिंजरा लावून सुद्धा माग लागला नाही. त्यामुळे पथके माघारी फिरली. 

सोमवारी रात्री बेहेरे टप्पा येथे मेर्वी येथून अजय अरुण थुळ माळुंगे येथे जात असताना त्याच्यावर हल्ला करून जखमी केले. तसेच रत्नागिरीतून गावखडी तिकडे जाणारे श्री. पेजे यांच्यावर यांच्या दुचाकीस्वार हल्ला करू त्याला जखमी केले. तसेच मेर्वी येथील श्रीमती पायल खर्डे या पावस वरून घरी जात असताना त्यांच्या दुचाकीवर हल्ला केल्याने पायल खर्डे जखमी झाले आहेत. बिबट्या पुन्हा सक्रिय झाल्याने ग्रामस्थांनमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता वन विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.