आईचे टोकाचे पाऊल… आधी दोन मुलींना संपवले नंतर घेतला गळफास

रत्नागिरी:–  40 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह गळफास घेत आत्महत्या केली. रायपाटण खाडेवाडीत सायंकाळी 6 वाजता ही धक्कादायक घटना घडली. 

 बुधवारी सायंकाळी विवाहितेचा पती आणि दिर शेतात काम करत होते तर सासु – सासरे बाहेर गेले होते. यावेळी विवाहितेने प्रथम आपल्या 6 वर्षांच्या आणि नंतर 3 वर्षांच्या चिमुकलीला गळफास लावला. त्यानंतर तिने स्वतःला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून विवाहितेने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली याचा शोध पोलिस घेत आहेत.