गणपतीपूळे समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या दोन कासवांना जीवदान

रत्नागिरी:- भरतीच्या प्रचंड लाटांसोबत किनाऱ्यावर येऊन जाळ्यात अडकलेल्या दोन समुद्री कासवांना येथील ग्रामस्थांनी जीवदान दिले. जाळ्यात अडकलेल्या दोन कासवांना सोडवत त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. 
 

बुधवारी समुद्राला मोठी भरती आली होती. उधाणाच्या मोठमोठ्या लाटा समुद्रकिनारी येऊन धडकत होत्या. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन समुद्री कासव किनारी जाळ्यात अडकलेली दिसून आली. उधाणाच्या लाटांसोबत ही कासवे जाळ्यात अडकून समुद्र किनारी आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जाळ्यात अडकलेल्या दोन कासवांना सर्पमित्र राज देवरुखकर, संजय रामाणी, विश्वास सांबरे आणि एमटीडीसी कर्मचारी, तटरक्षक कर्मचारी यांनी या दोन कासवांना पुन्हा समुद्रात सोडले.