भारतीय डाक कार्यालयात देखील ऑनलाईन व्यवहार

साडेपाचशे शाखांमधून साडेसहा कोटींचे व्यवहार 

रत्नागिरी:- भारतीय डाक विभागाच्या रत्नागिरी अधिक्षक डाकघर कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व 650 टपाल कार्यालयात बँकींग व्यवहार सुरु आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात रत्नागिरी शाखेतून 21,357 व्यवहार झाले असून 6.41 कोटी इतकी रक्कम काढण्यात आली आहे.

भारतीय डाक विभागाच्या रत्नागिरी अधिक्षक डाकघर कार्यालयातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व 650 टपाल कार्यालयांत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची सुविधा सुरू आहे. या सर्व कार्यालयात सर्व प्रशिक्षित पोस्टमन व ग्रामीण डाकसेवकांना स्मार्ट फोन पुरवण्यात आलेले आहेत. या स्मार्ट फोनद्वारे सर्व राष्ट्रीयीकृत बँकेतील खातेधारक पोस्ट कार्यालयातून सीपीएसच्या माध्यमातून पैसे काढू शकतील. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गावांगावात पोस्ट कार्यालयाची आयपीपीबीची शाखा कार्यरत असून ग्रामीण भागातील जनतेला पैसे काढण्यासाठी कोणत्याही बँकेत किंवा एटीएमला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात किंवा आपल्या भागात टपाल वितरणासाठी येणार्‍या टपाल वितरकाशी (पोस्ट्मन) संपर्क करून आधार क्रमांकाच्या आधारे आपले पैसे अगदी सहजरीतीने व अत्यंत कमी वेळेत काढता येतील .

एईपिएस द्वारे एकावेळी एक व्यक्ती दहा हजार रुपये काढू शकतो. व्यवहार करत असताना संबंधित व्यक्तीचे बँक अकाऊंटशी संलग्न असलेले आधार कार्ड व व फोन सोबत असणे आवश्यक आहे. आतापर्यंत चालू आर्थिक वर्षात रत्नागिरी शाखेतून 21,357 व्यवहार झाले असून 6.41 कोटी इतकी रक्कम काढण्यात आली आहे. या सुविधेचा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन अधीक्षक डाकघर एम.नरसिम्हा स्वामी यांनी केले आहे.