रत्नागिरी:- शनिवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 1 हजार 012 अहवालांमध्ये केवळ 5 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत 36 रुग्ण उपचारखाली आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 4 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 585 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.81 टक्के आहे. नव्याने 5 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 110 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 486 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.14 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 16 तर संस्थात्मक विलगीकरणात 20 रुग्ण उपचार घेत आहेत.