रत्नागिरी:- जिल्ह्यात 31 डिसेंबरला पर्ससिननेट मासेमारी बंद होणार असली तरी 1 जानेवारीपासून समुद्राच्या 12 नॉटिकल मैलबाहेर मासेमारी करण्याची परवानगी आहे. 12 नॉटिकल मैलबाहेर केंद्र शासनाचे सागरी क्षेत्र आहे. या समुद्र क्षेत्रात जाण्यासाठी राज्य शासनाच्या अखत्यारीतील समुद्री मार्ग आणि मासळी उतरवण्यासाठी स्थानिक बंदरांचा वापर करण्याची परवानगी आहे. त्यामुळे मासेमारीसाठी पर्ससिनधारक जाणार असल्याचे मच्छीमार नेते नासीर वाघू यांनी सांगितले.
सागरी हद्दीमध्ये 12 नॉटिकल मैलच्या आत राज्य शासनाच्या अधिकार आहे. त्या क्षेत्रातील पर्ससिनेट मासेमारी 1 जानेवारीपासून बंद होत आहे. 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत 4 महिन्यांचा कालावधी पर्ससिनेट मासेमारीला मिळाला. परंतु, यंदाच्या हंगामात मच्छीमारंपुढे अनेक संकट आली. निसर्ग चक्रिवादळासह निसर्गाच्या दृष्टचक्रामध्ये हा हंगाम सापडला. मच्छीमारांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मच्छीमार व्यवसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत. त्यात आता राज्याच्या समुद्र क्षेत्रातील मासेमारी बंद झाल्यानंतर 1 जानेवारीपासून बंद झाली आहे. मात्र केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रात मासेमारी करून मागील तोटा भरून निघण्याची आशा मच्छीमार नेते वाघू यांनी व्यक्त केली.
पर्ससीन नेट नौकांना केंद्र शासनाच्या नियंत्रणातील समुद्र क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी राज्याच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रमार्गातून जावे लागणार आहे. त्याचबरोबर पकडलेली मासळी उतरवण्यासाठी त्याच मार्गाने राज्याच्या अधिकार क्षेत्रातील बंदरांवर यावे लागणार आहे. यासंदर्भातील येणार्या अडचणींची माहिती बंदर व मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना देण्यात आली असल्याची माहितीही मच्छीमार नेते वाघू यांनी दिली. त्यानुसार 1 जानेवरीपासून 12 नॉटिकल मैलाबाहेर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.