संगमेश्वरमधील बावनदीला पूर, जनजीवन विस्कळीत

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील बावनदीला पूर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सोमवारी बावनदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यानंतर रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने पात्र दुथडी भरून वाहत आहे.

वांद्री बाजारपेठ येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला होता. कोळंबे परचुरी मार्गावर असलेल्या पुलावरून सकाळी पाणी वहात होते. आता थोडा पावसाचा जोर कमी झाल्याने पुलाच्या खालून पाणी वाहू लागले आहे. मात्र पुरातून वाहत येणारा कचरा या पुलावर साचला आहे. 

 सप्तलींगी, तळे कांटे, वांद्री, उक्षी, मानसकोंड, परचुरी, कोळंबे, गावमळा परिसरात पुराचे पाणी नदीकाठच्या भातशेतीत घुसल्याने शेती कुजण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.