विल्ये गावात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये दहशत

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील विल्ये गावात गेली अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर असून अनेक बकऱ्या, कुत्रे ठार मारण्याचे प्रकार सुरू असतानाच सोमवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास विल्ये देसाईवाडी येथील शेतकरी श्री. चंद्रकांत काशिराम साळवी यांच्या मालकीच्या गाईचे दोन महिन्यांच्या वासराला बिबट्याने वाड्यात घुसून ठार केल्याची घटना घडली.

सोमवारी सकाळी बिबट्याने श्री. साळवी यांच्या वाड्यात घुसून वासरावर हल्ला केल्याचा कानोसा गावचे सामाजिक कार्यकर्ते व प्रगत शेतकरी श्री. अमर आझाद देसाई यांना मिळताच त्यांनी तात्काळ साळवी यांच्या गोठ्याकडे धाव घेतली आणि मोठ्या आवाजाने बिबट्याला हटकून लावण्याचा मोठा धाडसी प्रयत्न करत असतानाच या हल्ल्यात हे वासरू गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले होते, अशा स्थितीत अमर देसाई यांनी या वासराला पाणी पाजून वाचवण्याचा प्रयत्न केला असता, अखेर ते वासरू मृत्युमुखी पडले.

आवाजाने बिबट्याला हटकून लावण्याचा मोठा धाडसी प्रयत्न करत असतानाच या हल्ल्यात हे वासरू गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले होते, अशा स्थितीत अमर देसाई यांनी या वासराला पाणी पाजून वाचवण्याचा प्रयत्न केला असता, अखेर ते वासरू मृत्युमुखी पडले.

या घटनेची माहिती गावचे सरपंच स्वप्निल देसाई व प्रगत शेतकरी अमर देसाई, चंद्रकांत साळवी यांनी वनविभागाला दिल्यानंतर वन खात्याचे अधिकारी व पशुवैद्य अधिकारी यांनी विल्ये येथील झालेल्या घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी वनपाल श्री.गावडे, वनरक्षक-प्रभू साबणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद एकवडे यांच्या समवेत सरपंच स्वप्निल देसाई, अमर देसाई, चंद्रकांत साळवी, काशिराम साळवी, प्रकाश कांबळे यांनी बिबट्याच्या मुक्त वावरामुळे गावात उद्भवलेल्या समस्या अधिकारी वर्गाला सांगितल्या.विल्ये गावात बिबट्याचा वावर सुरू आहे.