रत्नागिरी:- मागील काही दिवसांच्या तुलनेत सोमवारी जिल्ह्यात सापडणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या घेतल्याचे चित्र आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 392 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून यातीळ 254 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 138 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 392 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 19 हजार 616 झाली आहे.
आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडत होते. सोमवारी मात्र रुग्णसंख्या कमी झाल्याचे चित्र आहे. 24 तासात 392 रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 19 हजार 616 जाऊन पोहचली आहे. रविवारी आलेल्या अहवालात 254 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 138 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज 1094 कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत एकूण 1,22,272 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 18 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 594 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.02 % आहे. आज जिल्ह्यात 88 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेट 67.10 टक्के आहे.
जिल्ह्यातील आज सापडलेल्या 392 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 138, दापोली 77, खेड 19, गुहागर 10, चिपळूण 97, संगमेश्वर 29, राजापूर 13 आणि लांजा तालुक्यात 9 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 12.71% आहे.