रिफायनरी विरोधी नेत्यांच्या अटकेने वातावरण तापले

राजापूर:- तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीच्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर विरोध करणाऱया दोघा नेत्यांना पोलिसांकडून अट करण्यात आल़ी पोलिसांच्या या घटनेने बारसू, गोवळ परिसरातील वातावरण चांगलेच तापले आह़े. सत्यजित चव्हाण व मंगेश चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या रिफायनरी विरोधी नेत्यांची नावे आहेत़. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून 2 हजार पोलिसांची कुमक जिल्ह्याबाहेरून मागवण्यात आली आह़े.

रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर आता जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन’ मोडवर आल्याचे पहायला मिळत आहे. सर्वेक्षणाला होणारा विरोध लक्षात घेता बारसू, गोवळ परिसरात 22 एपिल ते 31 मे 2023 या कालावधीपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनकडून पावले उचलली जात असल्याचे दिसत आह़े
भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात कूड ऑईल रिफायनिंग करणारा रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उद्योग प्रस्तावित आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाव्दारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे. मागील वर्षापासून या पकल्पाला विरोध होत विरोधासाठी स्थानिक तसेच मुंबईत रिफायनरीविरोधी संघटना राजापूर तसेच मुंबई येथे स्थापन झाल्या आहेत. त्या माध्यमातून ते विरोध दर्शवत आहेत. या बाबत रिफायनरी विरोधकांनी राजापूर शहरात मोर्चा, मेळावे, मुंबई येथील आझाद मैदान येथे धरणे, हिंसक आंदोलन अशा स्वरूपाची आंदोलने केली आहेत.

रिफायनरी पकल्पासाठीच्या सर्वेक्षणामुळे परिसरातील वातावरण तापले आह़े. या पार्श्वभूमिवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन हजार पोलीस बल जिल्हाबाहेरून मागविण्यात आले आह़े. अशी माहिती समोर येत आह़े. रविवारी रत्नागिरीत पोलीस दलाच्यावतीने लाँग मार्च काढण्यात आल़े