रामआळीतील गंभीर जखमी गिरण मालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील राम आळी भागातील पीठ व मसाला गिरणीच्या बेल्ट मध्ये पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या गिरण मालकाचा उपचारा दरम्यान अखेर मृत्यू झाला. कोल्हापूर येथे ही घटना घडली.

शहरातील तेली आळी येथे राहणारे अनिल भार्गव पोटफोडे (वय ५७) यांची राम आळी येथे पीठ व मसाला गिरण आहे. शनिवारी सायंकाळी गिरणीमध्ये काम सुरू असताना गिरणीच्या बेल्टमध्ये पाय अडकून ते मशीन मध्ये खेचले गेल्याची घटना घडली होती. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने परिसरातील व्यावसायिकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. गंभीर जखमी झालेल्या अनिल पोटफोडे यांचे शनिवारी मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झाले. आज त्यांचा मृतदेह रत्नागिरीत आणण्यात आला.