रत्नागिरी:- राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले प्रवेशनाट्य अखेर संपले. त्यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांसह टेंभीनाका येथील आनंदाश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आनंदाश्रमात मंत्री उदय सामंत, किरण सामंत उपस्थित होते.
तत्पूर्वी साळवी यांनी आपल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. शिवसेना पक्षप्रवेशाआधी राजन साळवी यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षप्रवेशासाठी रत्नागिरी आणि राजापूर मतदारसंघांमधून ११ बसेसमधून कार्यकर्ते ठाण्यात दाखल झाले आहेत.
माजी आमदार साळवी म्हणाले की, पक्ष सोडताना डोळ्यात अश्रू आहेत, पण नवीन पहाट घेऊन सुरूवात करत आहे. रत्नागिरी जिल्ह्याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योग्य निर्णय घेतला नाही, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.