धक्कादायक! पणदेरीतील तरुण दहशदवाद्यांचा फायनान्सर

जंगलातील प्रात्यक्षिकांनाही हजेरी लावल्याचा संशय

रत्नागिरी:- पुणे पोलीस आणि एटीएसने दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर दहशतवादी कारवायांमधे सहभाग असलेल्या संशयीतांना अटक करण्याची संख्या वाढत आहे. दहशतवादी कारवायांप्रकरणी एटीएसकडून रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील पणदेरीमधील ३० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांना आश्रय देण्याबरोबरच त्यांना आार्थिक रसद पुरवल्याचा आरोप या संशयितांवर आहे. तर दहशदवाद्यांनी जंगलामध्ये केलेल्या प्रत्यक्षिकाच्यावेळी हजर असल्याचा संशय त्याच्यावर असून कोकणात कुठे कुठे दहशदवाद्यांनी प्रत्यक्षिके केली.याच्या शोध एटीएस करत आहे.

रत्नागिरीतील मंडणगडमधील पणदेरीमधून एकाला अटक केल्यानंतर आतापर्यंत एकूण ४ संशयित आरोपींना अटक झाली आहे. यात पुण्याच्या मिठानगर कोंढवा भागातील रहिवासी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान (वय २३ वर्ष), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी ( वय २४ वर्षे, कोंढवा, पुणे दोघेही मूळ रा. रतलाम मध्यप्रदेश) अशी या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत.

दहशतवादी कृत्यांमधे सहभाग आणि दहशतवाद्यांना मदत करणार्यांवर एटीएसने जोरदार मोहिम उघडली असून आणखी तपास सुरू आहे. पुण्यात राहत असलेल्या दोन अतिरेक्यांना आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या एकाला रात्री पुण्यात आल्यानंतर आश्रय देण्यासाठी या आरोपीने मदत केल्याची माहिती आहे. त्याची पोलीस कोठडी सुद्धा घेण्यात आलेली आहे. या दोन दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणार्या आरोपीचा शोध घेऊन त्याला पणदेरीमध्ये पकडण्यात आले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे.
याबाबत आणखी एका संशयित आरोपीला पकडण्यासाठी राज्यात पथक गेल्याची माहिती देण्यात आली आहे. तपासात त्याचा गुन्हा निष्पन्न झालेला आहे. तपासाबाबत गोपनीयता बाUगण्याच्या दृष्टीने एटीएसने त्या व्यक्तीचे नाव जाहीर केलेले नाही. तसेच तपासकामासाठी परराज्यात गेलेल्या पोलीस पथकाने एका संशयिताला चौकशीसाठी हजर राहणेबाबत नोटीस बजावली आहे. तो आल्यानंतर गुन्हयातील सहभागाबाबत चौकशी करण्यात येणार आहे. सर्व अटक आरोपींचा, त्यांच्या फरार झालेल्या साथीदाराचा, गुन्हयातील अटक आरोपींना फरार कालावधीत सहाय्य करणार्या लोकांचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडील विविध पथके करत आहेत.

पणदेरी मधील तरूण दहशदवाद्यांना आर्थिक सहाय्य करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे तो पैसे नेमके कुठून आणतो, तो दहशदवाद्यांसोबत प्रत्यक्षिकांसाठी कुठे कुठे गेला होता. दहशदवाद्यांना त्यांने कोकणात आणले होते का? याचा शोध एटीएस घेत आहे.