रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 172 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 172 पैकी 132 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 40 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. मागील चोवीस तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 48 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा चिंताजनक असून बुधवारी जिल्ह्यात 172 नव्या रुग्णांची भर पडली. मंगळवारी जिल्ह्यात 138 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 11 हजार 880 वर जाऊन पोहचली आहे. बुधवारी आलेल्या अहवालात 132 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 40 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज 388 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत एकूण 103601 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
चोवीस तासात 48 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 10 हजार 516 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 88.52 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने 4 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 386 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.25 % आहे.
जिल्ह्यातील आज सापडलेल्या 172 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 39, दापोली 1, खेड 25, गुहागर 13, चिपळूण 52, संगमेश्वर 33, राजापूर 3 आणि लांजा तालुक्यात 6 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 10.19% आहे.