जि. प. शाळेतील ६२ विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत चमकले

रत्नागिरी:- इंग्रजी शाळांच्या तुलनेत कमी भौतिक सुविधा असूनही दिवसेंदिवस मराठी शाळांची गुणवत्ता वाढलेली दिसत आहे. यावर्षी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत ६२ विद्यार्थी चमकले आहेत. स्पर्धा परीक्षेमध्येही जिल्हा परिषदेचे विद्यार्थी यश संपादन करताना दिसत आहेत.

खासगी शाळांच्या पटीत जि.प.च्या मराठी शाळा टिकविण्यासाठी सध्या विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. गुणवत्ता वाढविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. त्याला यशही मिळत आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्हा परिषदेचे विद्यार्थी अव्वल ठरत आहेत.

केंद्र सरकारअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, ८० पैकी ६२ विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत.

शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमाचे हे यश असल्याचे सिद्ध झाले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांची गुणवता वाढ व्हावी, यादृष्टीने इस्त्रो नासा अभ्यास दौरा, प्रज्ञाशोध परीक्षा, नवोदय विद्यालय निवड परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षांकडे अधिक लक्ष केंद्रित केले होते. त्याचाच परिणाम असल्याचे अनेक अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक याचे मत आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थी संख्येचा आलेख चढता असल्याचे दिसून येते आहे. गतवर्षी ५१ विद्यार्थी निटते. यावर्षी ती संख्या ६२ वर गेलेली आहे.

शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमाचे हे यश असल्याचे सिद्ध झाले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांची गुणवता वाढ व्हावी, यादृष्टीने इस्त्रो नासा अभ्यास दौरा, प्रज्ञाशोध परीक्षा, नवोदय विद्यालय निवड परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षांकडे अधिक लक्ष केंद्रित केले होते. त्याचाच परिणाम असल्याचे अनेक अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक याचे मत आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थी संख्येचा आलेख चढता असल्याचे दिसून येते आहे. गतवर्षी ५१ विद्यार्थी निवडले होते. यावर्षी ती संख्या ६२ वर गेलेली आहे.

जि. प. शाळेतील मुलांच्या या यशामध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पूजार यांनी शिक्षण विभागात राबवलेले उपक्रम ही सहायभूत ठरले. जि.प. रत्नागिरीच्या या यशाबद्दल नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक व अधिकारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

‘जिल्हा परिषद शाळेतील’ विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेची गोडी लागावी, स्पर्धा परीक्षेचा टक्का वाढवा, स्पर्धा परीक्षेविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्रयत्न केले, त्या प्रयत्नाचा भाग म्हणजे नवोदय परीक्षेतील यश. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या ६२ विद्यार्थ्यांची निवड होणे, हा अभिमानस्पद क्षण आहे – बी. एम. -कासार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)