रत्नागिरी:-नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 721 अहवालांमध्ये केवळ 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत 35 रुग्ण उपचारखाली आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 5 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 585 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.81 टक्के आहे. नव्याने 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 109 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 489 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.15 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 18 तर संस्थात्मक विलीगिकरणात 17 रुग्ण उपचार घेत आहेत.