जिल्ह्यात 24 तासात 77 नवे पॉझिटिव्ह रुग्ण 

दोघा रुग्णांचा मृत्यू; 109 जण कोरोनामुक्त

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 77 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 38 जण आरटीपीसीआर तर 39 जणांनी अंटीजेन टेस्ट केली आहे. नवे 77 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 7 हजार 408 वर पोचली आहे. 
 

मागील चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 63 वर पोचली आहे. नव्याने मृत्यू झालेल्या दोन रुग्णांमध्ये एक रत्नागिरीतील तर एक चिपळूण मधील रुग्णाचा सामावेश आहे. बुधवारी 205 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत 36 हजार 552 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 
 

चोवीस तासात 109 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 6 हजार 325 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 85.38 टक्के आहे. तसेच जिल्ह्याचा मृत्युदर देखील वाढून 3.55 टक्क्यांवर पोचला आहे. नव्याने सापडलेल्या 77 रुग्णांमध्ये खेड 7, गुहागर 12, चिपळूण 21, संगमेश्वर 1, रत्नागिरी 33 आणि राजापूर तालुक्यात केवळ 3 रुग्ण सापडले आहेत.