रत्नागिरी:- रविवारी आलेल्या अहवालानुसार 67 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 172 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यत 74 हजार 079 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.85 टक्के आहे. नव्याने 67 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 384 इतकी झाली आहे.
कोरोनाने नव्याने 5 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 24 तासात 4 तर यापूर्वीच्या एका मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 391 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.09 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 362 तर संस्थात्मक विलगीकरणात 395 रुग्ण उपचार घेत आहेत.