रत्नागिरी:- मागील 24 तासात 172 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर दहा रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नव्याने 172 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 72 हजार 477 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यँत 68 हजार 210 रुग्ण बरे झाले आहेत. तर 24 तासात 482 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. नव्याने दहा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत दहापैकी 24 तासातील 4 त्यापूर्वीचे 6 असे 10 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 116 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 2.92 तर रिकव्हरी दर 94.11 टक्के आहे. सद्यस्थितीत लक्षण नसलेले 1 हजार 596 तर लक्षण असलेले 414 रुग्ण आहेत.