जिल्ह्यात 24 तासात 125 पॉझिटिव्ह रुग्ण; 5 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 125 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर पाच रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 118 रुग्ण उपचाराअंती म कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 72 हजार 853 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 31 टक्के आहे. नव्याने 125 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 76 हजार 457 इतकी झाली आहे. 

कोरोनाने नव्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  पाचपैकी 24 तासातील 2 तर यापूर्वीच्या 3 मृत्यूचा समावेश आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 360 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.09 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 491 तर संस्थात्मक विलीकरणात 161 रुग्ण उपचार घेत आहेत.