रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 615 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 615 पैकी 239 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 376 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 615 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 19 हजार 224 झाली आहे.
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आता पर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. 24 तासात 615 रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 19 हजार पार जाऊन पोहचली आहे. रविवारी आलेल्या अहवालात 239 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 376 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 24 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 576 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.99 % आहे. आज जिल्ह्यात 37 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेट 68.01 टक्के आहे.
जिल्ह्यातील आज सापडलेल्या 615 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 231, दापोली 24, खेड 28, गुहागर 140, चिपळूण 52, संगमेश्वर 76, राजापूर 40 आणि लांजा तालुक्यात 24 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 13.68% आहे.