रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 832 अहवालांपैकी केवळ 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात 24 तासात 4 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 471 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.79 टक्के आहे. नव्याने 9 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 6 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 483 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.14 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 26 तर संस्थात्मक विलगीकरणात 21 रुग्ण उपचार घेत आहेत.