रत्नागिरी:- बुधवारी आलेल्या जिल्ह्यात 70 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही ही दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यात 24 तासात 12 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 75 हजार 228 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.10 टक्के आहे. नव्याने 70 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 285 इतकी झाली आहे.
कोरोनाने 24 तासात एकाही मृत्यूची नोंद झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 428 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 345 तर संस्थात्मक विलगीकरणात 279 रुग्ण उपचार घेत आहेत.