जिल्ह्यात नव्याने 16 पॉझिटिव्ह रुग्ण; 252 निगेटिव्ह

रत्नागिरी:- मागील चोवीस तासात पुन्हा 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील चार दिवसात जिल्ह्यात 83 रुग्ण सापडल्याने रत्नागिरीकरांच्या चिंतेत थोडी वाढ झाली आहे. 

मागील 24 तासात 252 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही ही मात्र दिलासादायक बाब ठरली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 126 रुग्ण उपचाराखाली आहेत. 
 

वाढलेली रुग्णसंख्या रत्नागिरीकरांची चिंता वाढवणारी आहे. नव्याने 16 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 749 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 252 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 54 हजार 393 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 13 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 246 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 319 असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.25 टक्के आहे.