जिल्ह्यात चोवीस तासात केवळ 12 जण कोरोना पॉझिटिव्ह; 181 निगेटिव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात केवळ 12 बाधित रुग्ण सापडले आहेत. चोवीस तासात 181 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 
 

सोमवारी सायंकाळी प्राप्त अहवलानुसार जिल्ह्यात 181 जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 48 हजार 582 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सोमवारी 29 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आता पर्यंत 8 हजार 430 रुग्णांपैकी 7 हजार 827 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.84 टक्के आहे. 
 

नव्याने सापडलेल्या 12 पैकी 8 जण आरटीपीसीआर तर 4 जणांनी अँटिजेन चाचणी केली होती. मागील चोवीस तासात जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने 316 बळी घेतले आहेत.