रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 942 अहवालांमध्ये केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत 31 रुग्ण उपचारखाली आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 3 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 586 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.81 टक्के आहे. नव्याने 3 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 106 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 489 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.15 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 16 तर संस्थात्मक विलगीकरणात 15 रुग्ण उपचार घेत आहेत.