रत्नागिरी:- रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 864 तापसण्यांमध्ये केवळ 20 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 81 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही.
जिल्ह्यात 24 तासात 81 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 81 हजार 387 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.54 टक्के आहे. नव्याने 20 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 303 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 526 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 132 तर संस्थात्मक विलगीकरणात 196 रुग्ण उपचार घेत आहेत.