जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

रत्नागिरी:- राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज येथे केली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित गÏामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा कलावधी ‚ १६ ते २० ऑक्टोबर २०२३ नामनिर्देशनपत्रांची छाननी ‚ २३ ऑक्टोबर २०२३, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा कालावधी ‚ २५ ऑक्टोबर २० २३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप ‚ २५ ऑक्टोबर २०२३, मतदान ‚ ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतमोजणी ‚ ६ नोव्हेंबर २०२३
गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल.