कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग उद्यापासून वाढणार

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे. १० जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी वेळापत्रकाला सोमवारपासून ब्रेक लागणार असून १ नोव्हेंबरपासून रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार आहे. 

सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात रोहा ते ठोकूरपर्यंत ताशी ७५ किमी, वीर ते कणकवली ताशी ७५, कणकवली ते मडगाव ताशी ९०, मडगाव ते कुमठा ताशी ७५, कुमठ्यापासून उडुपीपर्यंत ताशी ९० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या. हे पावसाळी वेळापत्रक संपुष्टात येणार असून गाड्यांचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार आहे.