रत्नागिरी:- बेदरकारपणे रिक्षा चालवून अपघात करत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवार 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा.कसोप फाटा ते कसोप जाणार्या रस्त्यावरील उताराच्या वळणात घडली होती.
सुहास विष्णू साळवी (48,रा.कसोप,रत्नागिरी) मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी ते आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच -08-एक्यु- 4327) घेउन कसोप फाटा ते कसोप जाणार्या रस्त्याने बेदरकारपणे घेउन जात होते. तेथील उतारातील वळणात त्यांचा रिक्षेवरीला ताबा सूटल्याने रिक्षा उजव्या बाजुला मातीच्या कठड्याला धडकून हा अपघात झाला. यात सुहास साळवी यांच्या डोक्याला, हाता-पायांना गंभिर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.