रत्नागिरी:- राज्यात ओमायक्रॉनचा कहर सुरू झाल्याने पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात उद्यापासून कडक निर्बंध घालण्यात आले असून स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद तर शाळा कॉलेजही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृह, केश कर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे.
उद्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे नियम लागू करण्यात आले आहेत.यात सकाळी ५ ते रात्री ११ राज्यात जमावबंदी लागू असून रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू असणार आहे. तसेच उद्याने, पर्यटन स्थळे बंद राहणार आहेत. केश कर्तनालय ५० टक्के क्षमतेने 7 पर्यंत सुरु राहतील तर रेस्टॉरंट आणि नाट्यगृहे तसेच चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहेत.
२ डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येईल. राज्यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी कंपन्यांमध्ये २ डोस घेतलेल्यांनाच परवानगी असून खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. लग्नासाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. लग्न समारंभांसाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांनाच परवानगी निश्चित कारण्यात आली आहे.