रत्नागिरीतील भोगाव पॅटर्न! कोरोनाला वेशीवर रोखलं, गावात आजवर एकही कोरोनाबाधित नाही

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भोगाव गावाने कोरोनाला वेशिवरच रोखला आहे. दीड वर्ष उलटून गेले तरीदेखील गावात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. 

ग्रामपंचायतीने केले उत्तम नियोजनकशेडी घाटापासून अवघ्या 10 किमी अंतरावर भोगाव हे गाव आहे. या गावात जवळपास 350 घरं असून 1200 लोकांची वस्ती आहे. हे गाव ग्रामीण भागात असले तरीही गेली दोन वर्षे कोरोनाला गावच्या वेशीवरच रोखण्यात यश आलं आहे. याचे एकमेव कारण म्हणजे गावच्या ग्रामपंचायतीने आपल्या गावात केलेले नियोजन. ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्य आणि ग्रामकृतीदल यांनी कोरोना काळात आपल्या गावकऱ्यांची घेतलेली काळजी. आपल्या गावात प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावरच सॅनिटायझयर स्प्रे करुन त्यातूनच गावात प्रवेश करावा अशी उपाययोजना केली.एक वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायतीकडून माफगावकरी विश्वासाने सांगत आहेत, आमच्या गावात आजवर कोरोना बाधित एकही रुग्ण नाही. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. घर संसाराचा गाडा चालवायचा कसा? आर्थिक अडचणीत अडकलेल्या गावकऱ्यांसाठी गावात दरवर्षी घेतली जाणारी एक वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायतीने माफ केली आहे.  गावच्या एकीमुळे कोरोनाला आपण वेशीवरच रोखू शकतो हे या भोगाव गावच्या रहिवाशांनी सिद्ध करून दाखवले आहे.