रत्नागिरी:- यावर्षी दि. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. कोकण मार्गावर सोडण्यात येणार्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण १२० दिवस आधी म्हणजेच दि. १० मे पासून खुले होणार असल्याने गणेशभक्त कमालीचे सुखावले आहेत. नियमित रेल्वे गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी चाकरमान्यांची तिकीट खिडक्यांवर चढाओढच सुरू होणार आहे.
गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात येतात. कोकणात जार्णाघ्या सर्व गाड्यांचे बुकींग २ ते ३ मिनिटातच हाऊसफुल्ल होत असल्याने आरक्षित तिकिटांसाठी तिकीट खिडक्यांवर तासंनतास ताटकळत उभे राहूनही चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडते. या वर्षी दि.७ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव कालावधीत कोकण मार्गावरून धावर्णाघ्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त सोडण्यात येणार्या गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकीटासाठी ऑनलाईन प्रमाणेच तिकीट खिडक्यांवरही गर्दी उसळणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर नेमक्या किती गणपती स्पेशल चालवणार, हे अद्याप रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेले नाही. मात्र, दि. १० मे पासून गणेशोत्सवात धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे. यामुळे चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी येण्याचे नियोजन करणे सुकर होणार आहे.